रहस्य पुस्तक मराठी समरी
मिञांनो, तुमची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे का? आणि लाख प्रयत्न करूनही तुमच्या हाती फक्त अपयशच लागतं आहे का? आणि तुम्हाला असे वाटतं आहे का, की तुम्ही कधी ही यशस्वी होऊ शकत नाही? तर मित्रांनो, वेळ आली आहे की तुम्ही हे पुस्तक वाचण्याची आणि या सर्व गोष्टींचे कारण आणि उपाय याबद्दल जाणून घेण्याची…
मित्रांनो, हे पुस्तक आपल्याला त्या सर्व रहस्यांबद्दल सांगते, ज्यामुळे नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. रहस्य या पुस्तकाच्या मदतीने, आपण Positivity च्या शक्ती ला ओळखून त्याचा उपयोग करण्यास शिकू आणि पाहूया की आपण स्वतःचे भाग्य कसे लिहू शकतो.
कृतज्ञता व्यक्त केल्याने तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
तुमच्या विचारांमुळे तुमचे स्वास्थ कसे बदलू शकतात.
रहस्य काय आहे – What is Secret in Marathi
मिञांनो रहस्य तुम्हाला हवी असणारी कोणतीही गोष्ट मिळवून देते. जसे की सुख, आरोग्य आणि धनसंपत्ती तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनू शकता.
मिञांनो तुम्ही कुठेही असा भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा इतर कुठल्याही देशात. मित्रानो आपण सर्वजण एकाच प्रकारच्या शक्तीने एकाच वैश्विक नियमानुसार काम करतो. आणि तो एकच नियम आहे, ‘आकर्षण, रहस्य ‘ म्हणजे हाच आकर्षणाचा नियम .
मित्रानो 1666 ला न्यूटन गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला, पण या शक्तीचा शोध लावायचा आधी ही शक्ती तेवढ्याच शक्तीने काम करत होती. फक्त न्यूटन मुळे आपल्याला त्या शक्तीची माहिती झाली. आणि त्या सोबतच हा नियम सर्वासाठी सारखाच काम करतो.
जसे एखाद्या व्यक्तीला उंच इमारती वरून खाली ढकलले तर ती व्यक्ती किती ही चांगली असली किंवा किती ही वाईट असली तरी ही ती व्यक्ती खाली जमिनीवरच पडणार. सेम त्या प्रमाणे आकर्षणाचा नियम त्याला मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या अश्या दोन्ही व्यक्ती साठी एक सारखाच काम करतो.
मित्रानो या नियमाला तुम्ही खरे माना किंवा नका मानू, तरी ही तो तुमच्या साठी काम करतच असतो. मिञांनो विल्यम शेक्सपियर, रॉबर्ट ब्राऊनिंग, सॉक्रेटिस आणि लिओ नार्डो द विंसी या सारख्या अनेक विद्वानांना ह्या नियमा बद्दल माहित होते, आणि ते लोक या नियमाचा वापर करत होते.
हजारो वर्षापासून काही मोजक्याच लोकांना ह्या रहस्या बद्दल माहित होते, पण ह्या रहस्याला लेखिका Rhonda Byrne यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर उघड केले आहे. या रहस्याचा उपयोग करून लोकांनी आपल्या जीवनात संपत्ती आकर्षित केली आहे.
जाणून बुजून विचारपूर्वक असेल किंवा नकळत. असे लोक नेहमी संपत्ती – समृद्धी विपुलतेचा विचार करीत असतात. इतर कोणत्याही विरोधी विचाराला ते आपल्या मनात थारा देत नाहीत. त्यांचे सर्वात प्रबळ विचार हे संपत्तीविषयकच असतात आणि ते फक्त संपत्तीविषयीच विचार करीत राहतात.
याशिवाय दुसरं काही त्यांचा मनात येतच नाही. या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो, संपत्ती – समृद्धी विषयीच्या प्रबळ विचारांमुळेच संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित होते. चला तर मग आकर्षणाच्या नियमा बद्दल जाणून घेऊया.
आकर्षणाचा नियम म्हणजे काय ?
मिञांनो तुमच्या जीवनात जे जे येते, घडत असते ते ते तुम्हीच आकर्षित करीत असता. आणि ते तुम्ही तुमच्या मनातील प्रतिमांद्वारे आकर्षित करता. ज्याचा तुम्ही सतत विचार करता त्या मानसप्रतिमा, जे जे तुमच्या मनात चाललेल असत ते ते तुम्ही आकर्षित करत असता.
त्यांना हे कळलं असेल किंवा नसेलही ; पण घडलं हेच की आधी त्यांचे प्रबळ विचार हे श्रीमन्ती बद्दलचे होते म्हणूनच ते श्रीमंत होण्यात सफल झाले. त्यानंतर मात्र मिळालेलं वैभव गमावलं जाण्याच्या भीतिदायक विचारांना त्यांनी मनात आसरा दिला.
भीतीनं त्यांचं मन इतकं ग्रासून टाकलं की आता ते विचार अत्यंत प्रबळ झाले. आता संपत्तीप्राप्तीच्या विचारांचं पारडं हलकं झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीचं पारडं जड झालं. याच कारणाने त्यांनी धनदौलत गमाविली. एकदा वैभव गमाविल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली.
मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सकारात्मक संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं जड झालं, आणि वैभव परत आलं. आकर्षणाचा नियम तुमच्या विचारांनुसार क्रियाशील होतो , मग ते विचार कोणतेही, कसेही असोत.
समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात.
आकर्षणाचा नियम असे सांगतो की समान गोष्टी समान गोष्टींनी आकर्षित करतात. याचाच दुसरा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादा विचार मनात आणता तेव्हा तुम्ही तशाच प्रकारच्या इतर विचारांनाही स्वतःकडे आकर्षित करता. तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षणाच्या हा नियम कधी ना कधी नक्कीच अनुभवला असणार.
मित्रानो कधी तुम्ही अशा एखाद्या गोष्टीबाबत विचार करीत असता ज्याबद्दल तुम्ही नाखुष आहात. तुम्ही या गोष्टीबद्दल जितका अधिक विचार करू लागलात तितकी ती आणखी वाईट दिसायला लागली. हे असं होतं , कारण जेव्हा आपण सातत्यानं एकच विचार मनात आणता तेव्हा आकर्षणाचा नियम ताबडतोब त्याच्या सारखेच दुसरे विचार तुमच्याकडे खेचू लागतो.
काही मिनिटातच तुमच्या डोक्यात इतके सारे एकसारखे दुःखद विचार जमा होतात की परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट दिसू लागते. तुम्ही या गोष्टीबाबत जितका अधिक विचार करू लागाल तितके अधिक अस्वस्थ व्हाल. त्रासून जाल. पहा कधी असेही झालं असेल तुम्हाला समविचारांना आकर्षित केले जाण्याचा खाली दिलेला अनुभव आला असेल.
तुम्ही एखादं गाणं ऐकता आणि मग ते गाणं डोक्यातून निघता निघत नाही. हे गाणं पुन्हा पुन्हा तुमच्या मनात घुमत राहतं. तुम्हाला जाणवलंही नसेल की जेव्हा तुम्ही ते गाणं ऐकत होतात तेव्हा तुम्ही त्यावर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित असं केल्यामुळं तुम्ही त्या गाण्याबद्दलचे पुन्हा पुन्हा अधिक समविचार अत्यंत प्रबळ सामर्थ्याने, जोरदारपणे आकर्षित केले.
मिञांनो या सारख्या छोट्या छोट्या गोष्टी आकर्षणाच्या नियमा मुळेच घडत असतात. तुम्ही तुमच्या विचारातून कोणत्याही गोष्टीला आकर्षित करू शकता. इतकेच काय तुम्ही आता सध्या जे जगत आहात, ते तुमच्या कालच्या आणि भूतकाळातील विचारांचा परिणाम आहे.
मिञांनो तुम्ही तुमचा आजचा दिवस स्वतः आकर्षित केलेला आहे, सेम त्याच प्रमाणे तुम्ही जे आता सध्या विचार करत आहात ते तुमचे उद्याचे भविष्य ठरवतात. या जगातील प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट frequency आसते. जसे की गाडी, दगड, रेडिओ, टीवी यांना स्वतःची एक आपापली frequency आसते.
त्यांचं प्रमाणे आपल्या विचारांची पण एक frequency आसते, आपण जे विचार करत असतो, त्या विचारातून सतत frequency ब्रम्हांडात प्रक्षेपित केली जाते. आणि ही frequency समान गोष्टीना आकर्षित करते.
आपला मेंदू एक ट्रान्समिशन टॉवर सारखा काम करत असतो, जो सतत आपला विचार आणि कल्पनांचे तरंग सोडत असतो. आपले नकारात्मक विचार कायम नकारात्मक गोष्टीना आकर्षित करतात आणि सकारात्मक विचार सकारात्मक गोष्टीना आकर्षित करत असतात.
म्हणून मित्रांनो तुम्हाला नेमकं काय हवंय हे मनात अगदी स्पष्टपणे ठरवा. असं करून तुम्ही विश्वातील महान नियमांपैकी एक क्रियाशील करता. आकर्षणाचा नियम तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता तसेच बनता. तुम्ही ज्या वस्तुबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वात अधिक विचार करता ती आपल्याकडे आकर्षित करता.
जर तुम्ही समृद्ध-वैभवशाली जीवन कल्पनेत सतत रंगवीत रहाल तर ते तुम्ही नक्कीच आकर्षित कराल. हा सिद्धान्त प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत खरा ठरतोच. जेव्हा तुम्ही समृद्ध जीवनाची कल्पना करता तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या नियमानुसार जाणीवपूर्णक ‘जीवन-निर्माण’ करत आहात.
हे सगळं इतकं सोपं आहे तर मग एकच मोठ्ठं प्रश्नचिन्ह उरतं की प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातील जीवन का नाही जगू शकत? तर याच उत्तरं असे आहे की.
वाईट गोष्टींऐवजी चांगल्या गोष्टी आकर्षित करा.
समस्या हीच आहे की बहुतेक लोक त्यांना जे नको आहे, त्याचाच विचार करत राहतात. आणि मग त्यांना उगीचच आश्चर्य वाटत राहतं – त्यांच्या बाबतीत या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा का घडतात. लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळण्याचं एकमेव कारण आहे 👇👇
“त्यांना जे हवं आहे’ त्याचा विचार करण्याऐवजी ‘त्यांना जे नको आहे’ याचाच विचार अधिक करतात”
मित्रानो तुमचे स्वतःचे विचार लक्षपूर्वक ऐका. कारण नियम अत्यंत सत्य आहे – तो चुकत नाही. शतकानुशतके मानवजातीला ग्रासणारी प्लेग पेक्षाही भयंकर अशा रोगाची साथ कोणती तर ‘नको तेच मनात’ हा रोग! जेव्हा लोक वाणी-विचार-कृतीतून ‘जे नको आहे’ त्यावरच लक्ष केंद्रित करतात तेव्हा याच रोगाची विषवल्ली वाढवितात.
पण आता ही नवी पिढी मात्र हा इतिहास निश्चित बदलून टाकणार आहे. कारण आता तुम्हाला असं ज्ञान मिळणार आहे जे या रोगातून सहज मुक्ती देऊ शकेल. ही मुक्तीची वाट तुमच्यापासूनच सुरू होते आणि तुम्हीच या नव्या वैचारिक क्रान्तीचे प्रवर्तक बनू शकता. आणि यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. ‘जे तुम्हाला हवं आहे’ त्याचात सतत विचार करा. तेच बोला. तेच करा.
आकर्षणाचा नियम कार्यरत होताना या गोष्टीची पर्वा अजिबात करत नाही की तुम्ही एखादी गोष्ट चांगली समजता की वाईट; तुम्हाला ती खरंच हवी आहे किंवा नाही. हा नियम फक्त तुमच्या विचारांवर प्रतिक्रिया करतो.
म्हणूनच तुमच्यावरील लहान रकमेचे कर्ज हा देखील कर्जाचा डोंगर समजून काहीतरी भयंकर परिस्थिती स्वत:वर ओढविल्याची भावना तुम्ही मनात निर्माण केली तर हाच संकेत तुम्ही ब्रह्मांडात प्रक्षेपित करता “माझ्यावर भयंकर मोठं कर्ज आहे” तुम्ही स्वत:ला पुन्हा पुन्हा ठासून हेच सांगता.
तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर हीच गोष्ट अनुभवत राहता. आणि मग हीच गोष्ट तुम्हाला अधिक प्रमाणात, पुन्हा पुन्हा मिळत राहते. तुम्ही कर्जबाजारी बनत जाता. आकर्षणाचा नियम हा निसर्गनियम आहे. तो व्यक्तीनिरपेक्ष आहे.
तसंच आकर्षणाचा नियम एखादी गोष्ट चांगली की वाईट हे तो ठरवित नाही. तो तुमच्या विचारांना अस्तित्व देतो. तुमचेच विचार तुमचे जीवनानुभव बनवून तुमच्यासमोर साकारतो. तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत करतो.
आकर्षणाचा नियम “नाही” शब्दाला नाही ओळखत.
जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टींविषयी – हव्या असलेल्या गोष्टींविषयी विचार करता. आणि निश्चयाने त्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट नक्कीच देतो, पुन्हा पुन्हा! कधी तुम्ही अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करता ज्या तुम्हाला नको आहेत. जसे की 👇👇👇
- मला फैल व्हायचे नाही आहे.
- मला कर्जात बुडायचे नाहीं आहे.
- मला दारू प्यायची नाही आहे.
- मला जुगार खेळायचा नाही आहे.
मित्रानो जेव्हा आपण वरील दिलेल्या विचारासारखे विचार करत असतो, तेव्हा मग असे का होते की केवळ त्याच्या विरुद्ध गोष्टीच आपल्याकडे आकर्षित होतात?
कारण आकर्षणाचा नियम ‘नाही’ किंवा ‘मला नकोच’ अशा नकारार्थी शब्दांचे किंवा नकारात्मक अर्थांचे मोजमाप करू शकत नाही किंवा ते समजूही शकत नाही. म्हणून तुमच्या विचारा मध्ये नाहीं, नको या सारखे शब्द आणू नका.
रहस्यचा उपयोग कसा करायचा?
मित्रानो तुम्हाला “अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’ ही कथा माहित आहे का, जिथे अल्लाउद्दिन दिवा उचलतो आणि त्यावरची धूळ झटकतो. अचानक त्यातून राक्षस बाहेर येतो. हा राक्षस नेहमी एकच गोष्ट सांगत असतो.
“तुमची इच्छा हीच माझ्यासाठी ‘आज्ञा’ आहे.”
मित्रानो या कथेत असे सांगितलं आहे की राक्षस तीन इच्छा पूर्ण करतो, परंतु तुम्ही कहाणीच्या मुळापाशी गेलात तर तुमच्या लक्षात असे येईल की इच्छापूर्ती होण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कितीही आणि कोणत्याही इच्छा व्यक्त करा. त्या सर्व ईच्छा पूर्ण होऊ शकतात.
मित्रानो ही अद्भुत कथा दर्शविते की आपलं संपूर्ण जीवन आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट ही आपली आपणच निर्माण केलेली आहे. दिव्यातील राक्षसाने तर फक्त तुमच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं. दिव्यातील ही अद्भुत शक्ती म्हणजेच आकर्षणाचा नियम होय.
हा सदैव कार्यरत असतो. ऐकत असतो तुमची प्रत्येक गोष्ट, तुमचे विचार, वाणी आणि कृती हा अद्भुत नियम असं गृहीत धरतो की तुम्ही जे विचार मनात आणता ते ते सर्व तुम्हाला हवं आहे. तुम्ही जे जे बोलता ते ते सर्व तुम्हाला हवंच आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर काम करता ती तुम्हाला हवी आहे!
तुम्ही जणू या ब्रह्मांडाचे स्वामी आहात आणि तो फक्त तुमच्या सेवेसाठी आहे. हा अद्भुत नियम कधीही तुमच्या आज्ञांबाबत शंका व्यक्त करत नाही. तुमच्या मनात विचार आला की तो व्यक्ती वस्तू, व्यक्ती, परिस्थिती आणि घटना यांच्या माध्यमातून तुमची इच्छापूर्ती करण्यासाठी तात्काल वैश्विक शक्तींना कार्यरत करतो.
Step : 1 – मागा
पहिली पायरी आहे ‘मागा’ – मागणी करा म्हणजे मिळेल. ब्रह्मांडाला आदेश द्या. वैश्विक शक्तींना समजू दे की तुम्हाला काय हवंय. ब्रह्मांड तुमच्या विचारांनुसार प्रतिक्रिया दर्शविते.
तुम्हाला खरोखर नेमकं काय हवं आहे? थोडा वेळ शान्त बसा आणि एका कागदावर लिहा आणि लिहताना नेहमी वर्तमान काळात लिहा. तुम्हाला नेमक काय हवं’ याची निवड तर तुम्हाला करायलाच हवी. पण तुम्हाला नेमकं काय हवं हे अत्यंत स्पष्टपणे ठरवायला हवं.
जर तुम्ही ‘स्पष्ट’ नसाल तर आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी ती गोष्ट नाही देऊ शकत. कारण अशावेळी तुम्ही मिश्रित फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता आणि मग तुम्हाला मिश्र परिणाम मिळतात.
आयुष्यात कदाचित असं ठरविण्याची ही पहिलीच वेळ असेल पण आता शोध घ्या, जीवनात तुम्हाला खरोखरच नेमकं काय हवं आहे? आता तर तुम्हाला माहित झालेलं आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता.
कुणीही बनू शकता, काहीही करू शकता तुमच्यावर कोणतंही बंधन नाही – सीमा नाहीत… मग सांगा, तुम्हाला काय हवंय? मागणं’ ही रचनात्मक प्रक्रियेची पहिली पायरी आहे. म्हणूनच ‘मागणी करण्याची’ सवय लावून घ्या स्वतःला.
जर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल, निवड करता येत नसेल द्विधा मनःस्थिती झालेली असेल, काय हवं, काय करावं हेच समजत नसेल तरीही मागा! जीवनातील कोणत्याही बाबतीत कोणत्याही क्षेत्रात असफल-विवश होण्याची अजिबात गरज नाही, फक्त मागा!
पायरी २ : विश्वास ठेवा
मित्रानो दुसरी पायरी आहे – विश्वास ठेवणं. असा विश्वास बाळगा की ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे. म्हणजेच ‘दृढ निष्ठा’ ठेवा. अदृष्टावर निष्ठा! दृढ निष्ठा! तुम्ही असा दृढ विश्वास ठेवला पाहिजे की तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळालेलंच आहे.
तुम्हाला याची जाणीव असू दे की तुम्ही ज्या क्षणी मागता तेव्हा ते तुमचं झालेलंच असतं. तुमची संपूर्ण आणि दृढ श्रद्धा असलीच पाहिजे. जेव्हा तुम्ही कॅटलॉगमधून आर्डर देता तेव्हा त्यानंतर शांतपणे आरामात राहता. जीवनात निश्चिंत पुढे जात राहता कारण तुम्हाला माहित असतं की ज्या गोष्टीची ऑर्डर दिलेली आहे ती तुम्हाला नक्की मिळणारच आहे.
ज्या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटतात त्या आधीच मिळालेल्या आहेत असं समजूनच वागा. विश्वास ठेवा की जरुरी असेल तेव्हा या गोष्टी तुमच्याकडे आपोआप येतील. मग त्यांना येऊ दे ना! या गोष्टींबद्दल चिंता, काळजी, त्रास अजिबात करून घेऊ नका. त्या तुमच्याकडे सध्या नाहीत असा विचार सुद्धा मनात आणू नका.
पायरी ३ : प्राप्ती
मित्रानो तिसरी आणि शेवटची पायरी आहे, प्राप्ती! मिळणं! तुम्हाला हवी असलेली ती विशिष्ट गोष्ट मिळाल्यानंतर तुम्हाला किती आनंद होईल ना? तो आनंद आत्ताच अनुभवायला सुरूवात करा. अगदी या क्षणी.
तुम्हाला खरोखरच जी गोष्ट हवी आहे ती फक्त एकदाच मागा. असा विश्वास बाळगा की ती गोष्ट आता तुमची झालेलीच आहे, तुम्हाला मिळालेलीच आहे. आणि यानंतर ती गोष्ट मिळविण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे की ती गोष्ट मिळाल्याच्या आनंदात असणं.
जेव्हा तुम्ही अशा प्रकारे आनंदात असता तेव्हा ती गोष्ट मिळविण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असता, सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असता, आणि मग तुम्ही जे मागितलं असेल ते मिळतं.
तुम्ही फक्त अशाच गोष्टी मागाल ज्या मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद होईल, होय ना? म्हणूनच जेव्हा तुम्ही आनंदात खुषीत, सुखद, मनःस्थितीत असण्याच्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला घेऊन जाता तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट मिळते.

Comments
Post a Comment